Thursday, December 6, 2018

नानगाव | डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी महापरीनिर्वाण दिन नानगाव येथे मो...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी महापरीनिर्वाण दिन नानगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा !

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी महापरीनिर्वाण दिन नानगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.०६ डिसे.२०१८

बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक होते त्याच बरोबर ते एक नेते, अर्थतज्ज्ञ, आणि उत्कृष्ट कायदेपंडित होते. बाबासाहेब आंबेडकर सदैव दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजामध्ये समान न्याय आणि वागणूक मिळवून देण्यासाठी झटत राहिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हा जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्धचा लढाच म्हणावं लागेल.म्हणून आज संपूर्ण भारतभर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.नानागाव ग्रामपंचायत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून सर्वांच्या उपस्थिती मध्ये महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

गणेशरोड येथील समाजमंदिरा मध्येहि महापरीनिर्वाण दिन साजरा करून अंगणवाडी येथील लहान मुलांना खेळणी वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच सी.बी.खळदकर,माजी सरपंच राजकुमार मोटे,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विशाल शेलार,तंटामुक्ती अध्यक्ष संजय रासकर,माणिक आढागळे,विष्णू खराडे,दिपक पवार,दिलीप खळदकर.डॉ.सातपुते,शिशुपाल,विशाल आखाडे व आदि मान्यवर उपस्थित होते.



Monday, November 26, 2018

डि न्युज लाईव्हचे संपादक सचिन रुपनवर यांची म.रा राज्य दलित पँथरच्या प्रव...

सा.दौंड एक्स्प्रेस व डि न्युज लाईव्ह वृत्तवाहिनीचे संपादक सचिन रुपनवर यांची महाराष्ट्र राज्य दलित पँथरच्या प्रववक्ते पदी नियुक्ती

सा.दौंड एक्स्प्रेस व डि न्युज लाईव्ह वृत्तवाहिनीचे संपादक सचिन रुपनवर यांची महाराष्ट्र राज्य दलित पँथरच्या प्रववक्ते पदी नियुक्ती

डी न्यूज प्रतिनिधी: साप्ताहिक दौंड एक्स्प्रेस व डि न्युज लाईव्ह वेब वाहिनीचे संपादक सचिन रुपनवर यांची महाराष्ट्र राज्य दलित पँथर च्या प्रव्क्ते पदी नियुक्ती करण्यात आली ,   दलित पँथरचे  केंद्रीय कार्याध्याक्ष अशोकजी माने यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले,तर  बारामती महिला शहर अध्यक्ष पदी पुनम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली, यावेळी दलित पँथरचे पदाधिकारी उपस्थितीत  होते,

Sunday, November 18, 2018

मार्बल फरशी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला यवत पोलिसांनी केले जेरबंद !!


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:_दौंड तालुक्यातील नांदूर येथील मिराज सिरामिक्स टाईल्स कंपनीमध्ये कंपनीच्या स्विकृटीगार्डच्या मदतीने (दि.१५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास १७ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे २ हजार मार्बल फरशी बॉक्स टेम्पोमधून चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला यवत पोलिसांनी स्थानिक ग्रामसुरक्षा दल मित्रांच्या मदतीने जेरबंद केले आहे. इतर सात आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून यातील पसार झालेले बहुतेक आरोपी स्थानिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना दौंड न्यायालयाने (दि.२२) नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी दिली.

या प्रकरणी धीरेंद्रकुमार जाट (वय १९), प्रदीपकुमार दयाल (वय ३०), कुलदीप चाक (वय ३०), पवनकुमार शर्मा (वय २१), आकाश कुमार रॉय (वय २४ वर्षे सर्व मूळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. तर या चोरी प्रकरणी कंपनीचे मालक श्रीकांत सुधीर खाडिलकर (वय ५१ वर्षे रा. मुलुंड, मुंबई) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.१५) रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास नांदूर गावच्या हद्दीत असलेल्या मिराज सिरामिक्स या टाईल्स कंपनी मधील गोडाऊन मधून टाईल्स फरशीची चोरी करण्यात येत असल्याबाबतची माहिती यवत पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानुसार रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, सहाय्यक फौजदार परशुराम पिलाणे, विनोद रासकर, अजित काळे यांचे पोलीस पथक या कंपनीत गेले. यावेळी या स्टाईल फरशीच्या कंपनीत बारा आरोपी टेम्पो क्रमांक (एमएच ४२ एक्यु २१६९) मध्ये १ लाख ७५ हजार किंमतीचे १७० फरशी बॉक्स चोरून नेहण्याच्या उद्देशाने भरत असताना पोलीस पथकाला आढळले. यावेळी या पोलीस पथकाला पाहून सात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले तर पोलिसांनी स्थानिक ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. पोलिसांनी मार्बल फरशीसह टेम्पो ताब्यात घेतला आहे. या आरोपींनी गेल्या वीस दिवसात या चोरी व्यतिरिक्त १६ लाख रुपयांचे १ हजार ८३० टाईल्स बॉक्स चोरुन नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या चोरी प्रकरणात स्थानिकांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे करीत आहेत.

Monday, November 5, 2018

दौंड | दापोडीत बिबट्याचा ९ जणावर जीवघेणा हल्ला !

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा - शरद सूर्यवंशी(शिवसेना,पुणे जिल्हा ...

सुनील थोरात यांना मणीरत्न गौरव पुरस्कार 2018 प्रदान ..!


सुनील थोरात यांना मणीरत्न गौरव पुरस्कार 2018 प्रदान ..!
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: मांडवगण फराटा येथील वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील उप-मुख्याध्यापक सुनील थोरात यांना पद्मश्री डॉ.मनिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट,उरुळी कांचन यांच्या वतीने देण्यात येणारा शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय मणीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      थोरात हे इंग्रजी विषयाचे तज्ञ अध्यापक असून सुमारे २४ वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यी क्षेत्रातील विविधांगी भरीव कामगीरी बद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रसेवा समितीचे प्रमुख शिक्षण तज्ञ,प्रवचनकार व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे यांच्या शुभहस्ते व डॉ.अशोक के पाटील(उपाध्यक्ष म.दे.मा.ट्रस्ट), डॉ.माधवी रायते(डीन),दै.केसरी चे उपसंपादक स्वप्नील कुलकर्णी, दै.लोकसत्ताचे उपसंपादक मिलिंद ढमढेरे,कर्नल अरविंद जोगळेकर,लेखक शरद अत्रे  व अशोक शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार देण्यात आला.
       याप्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा,उपाध्यक्ष चंद्रकांतजी बाफना, शालेय समितीचे अध्यक्ष चंदूलालजी चोरडीया, संस्थेचे सचिव गुरुवर्य तू.म.परदेशी, प्राचार्य एस.टी.गद्रे,प्रशालेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,मांडवगण फराटा ग्रामस्थ व पालक वर्ग यांच्या वतीने सुनील थोरात यांचे विशेष अभिनंदन केले.

मनपूर्वक सर्वाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा - संपत फडके(उपाध्यक्ष,कॉंग...

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा - गणेश आखाडे(अध्यक्ष,भाजपा.दौंड तालुका)

Monday, October 29, 2018

आमदार राहुलदादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - समस्त ग्रामस्थ...

राहुल दादा कुल यांना पांडुरंग आण्णा काळे यांच्या कडून वाढदिवसाच्या हार्द...

राहुल दादा कुल यांना समस्त ग्रामस्थ डाळिंब गावाच्या वतीने वाढदिवसाच्या ह...

राहुल दादा कुल यांना हनुमान तरुण मंडळ कानगावच्या वतीने वाढदिवसाच्या हार्...

बोरीपार्धी ग्रामपंचायतीच्या वतीने राहुलदादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्द...

राहुल दादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - सुरेखा शिंदे (सरपंच...

राहुल दादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - मनीषा नवले(मा.सरपंच...

केडगाव ग्रामपंचायत - राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

राहुल दादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक मनीषा नवले !

दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभे...

Friday, October 19, 2018

आकाशची पाच दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी !



पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीचा आणि मोटारीचा अपघात !
आकाशची पाच दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी !

डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधी : ता.२० ऑक्टोंबर २०१८
सोलापूर-पुणे महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड शिवारात मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात आयटीआय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. हा अपघात शनिवार (ता. १३) ला दुपारी घडला होता.
आकाश राजेंद्र अडागळे (वय २१ रा. नानगाव, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मयत आकाश व त्याचा मित्र निखिल दामोदरे हे वरवंड येथे आयटीआयमध्ये शिक्षण घेत होते.शनिवारी दुपारी हे दोघे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच ४२ डब्ल्यू ७९६२) वरुन वरवंडकडून चौफुलाकडे येत होते. यावेळी पाठीमागून आलेली मोटारीने (एमएच ५० एल १८४१) यांना जोराची धडक दिली. या अपघातात आकाश गंभीर जखमी झाला. आकाश यास पुढील उपचारासाठी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान आकाश अडागळे या तरुणाचा गुरूवारी मृत्यू झाला. आकाश याचे वडील राजेंद्र तुकाराम अडागळे यांनी मोटार चालका विरोधात  यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मोटार चालकाविरोधात गुन्ह्यांची नोद केली आहे. 


Saturday, October 13, 2018

दौंड | नानगाव येथील श्री रासाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव !

नानगाव येथील श्री रासाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव


नानगाव येथील श्री रासाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.१३/१०/२०१८

दौंड तालुक्यातील नानगाव येथील ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या नवरात्र उत्सवास बुधवारी(ता.१०) रोजी सकाळी घटस्थापना करून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
गावातील ग्रामस्थांच्या वतीने पहाटे प्रथम देवीचा अभिषेक करून साडी चोळी,सोन्याचे अलंकार,व इतर घालून देवीची आरती करण्यात आली.
शारदीय नवरात्र उत्सवात दररोज पहाटे आरती व सायंकाळी देवीचा छबिना व आरती करण्यात येते.
आठव्या माळेला रात्री बारा वाजेनंतर देवीच्या मंदिरात होमहवणाचा कार्यक्रम असतो.
तसेच नवव्या माळेला गुरुवारी(ता.१८) रोजी दसरा सणाला देवीची पालखी ग्रामप्रदक्षिणा करून देवी मंदिरात आल्यानंतर देवीला मंदिरात झोपविले जाते.व नंतर कोजागिरी पौर्णिमेला देवीची आरती करण्यात येते.
या काळात मंदिर बंद असते.व मंदिरातील घंटा देखील बांधून ठेवण्यात येतात.तसेच कीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवीचे पुजारी राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
नवरात्र उत्सव काळात मंदिरात पाचव्या व सातव्या माळेला भक्तगणांची मोठी गर्दी असते व या काळात गावातून कामानिमित्त बाहेर असलेली मंडळी सहकुटुंब देवीच्या दर्शनासाठी येत असतात.तसेच परिसरातील भक्तगणही दर्शनासाठी येत असतात.
नवरात्र उत्सवानिमित्ताने मंदिरावर व मंफिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नवरात्र उत्सव काळात गावातील केशकर्तनालये बंद ठेवण्यात येतात.

Tuesday, October 9, 2018

नानगाव मध्ये 32 गॅस जोडचे वाटप !


नानगाव मध्ये 32 गॅस जोडचे वाटप !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: ता.१०/१०/२०१८
पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत दौंड तालुक्यातील नानगाव येथे मंगळवारी (ता.०९) रोजी ३२ लाभार्थी महिलांना मोफत एच.पी. गॅसचे वाटप करण्यात आले.
आतापर्यंत नानगावात लाभार्थी महिलांना एकूण ५०० गॅसचे वाटप करण्यात आले आहे असे यावेळी एच पी गॅसचे बोरीपरधी वितरक संपत मगर यांनी सांगितले.
उर्वरित लाभार्थी महिला याना वेळोवेळी गॅस चे वाटप करण्यात येणार आहे व त्याचा सर्वाना लाभ होणार आहे .
या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच सी.बी.खळदकर, माजी सरपंच विश्वास भोसले,भगवान झंवर,दादासाहेब खळदकर,प्रल्हाद रासकर,अमृत रासकर,तंटामुक्ती अध्यक्ष संजय रासकर व आदी मान्यवर उपस्थित होते.

Monday, October 8, 2018

धनगर समाजाची नागपूर ते पंढरपूर संघर्ष यात्रा !

धनगर समाजाची नागपूर ते पंढरपूर संघर्ष यात्रा
 डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधी | केडगाव | -   धनगर समाजाला हिवाळी अधिवेशनापर्यंत  अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या नाही तर पंढरपूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल. त्या अगोदर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज 22 ऑक्टोबरपासून नागपूर ते पंढरपूर संघर्ष रथयात्रा काढणार आहे. असा इशारा दौंड तालुक्यातील चौफुला येथे देण्यात आला आहे. 2014 मध्ये बारामतीतील आरक्षण आंदोलनाची पुनरावृत्ती पंढरपुरात होणार का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.   

     आरक्षणाच्या लढयासाठी चौफुला येथे राज्यस्तरीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. रथ यात्रेच्या आयोजनासाठी धनगर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये संघर्ष रथ यात्रेची माहिती देण्यात आली. राज्य समन्वय समितीचे सदस्य बापूसाहेब हाटकर ( मुंबई ), संदीपान नरवटे ( मराठवाडा ), विठ्ठल मारनर ( उत्तर महाराष्ट्र ), पांडुरंग मेरगळ व अशोक चोरमले ( पश्चिम महाराष्ट्र ), राम मरगळे ( कोकण ), देवेंद्र उगे ( विदर्भ ) श्रावण वाकसे ( मुंबई ) हजर होते. 

संघर्ष यात्रा 22 ऑक्टोबरला नागपूर येथून प्रस्थान करेल. चार चाकी वाहनांमधून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून जाईल. सात नोव्हेंबरला रथ यात्रेचे जेजूरी येथे आगमन होईल. जेजूरी ते पंढरपूर पायी यात्रा निघून ती 17 नोव्हेंबरला पंढरपूर येथे पोहचणार आहे. तेथे महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाच्यावतीने आमरण उपोषणाला कार्यकर्ते बसतील. एस.टी.चे जात प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. धनगर समाज बांधवांनी 17 नोव्हेंबरनंतर पंढरपूर येथे पाठिंब्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे.  

   पांडुरंग मेरगळ म्हणाले,  हे सरकार समाजासाठी एस.टी. समावेशाची प्रक्रीया राबवत आहे. परंतु  घटनेत समाजाचा अनुसुचीत जातीमध्ये समावेश आहे. या आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी सरकारने करावी अशी सकल धनगर समाजाची मागणी आहे. मुळात एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी धनगर समाजाने केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बारामती येथे आश्वासन दिले होते मात्र चार होऊनही त्यांनी ते पुर्ण 

केलेले नाही. सरकारने अंमलबजावणी केली नाही तर सरकारला ही आंदोलनाची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. अॅड. दौलत ठोंबरे म्हणाले, इतर  राज्यांनी केंद्राची शिफारस न घेता धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये केला आहे. 

      यावेळी तळोदा संस्थानचे संस्थानिक अमरसिंहराजे बारगळ, मोरेश्वर झिले, आनंद थोरात, अॅड.जी.बी.गावडे, अॅड. दौलत ठोंबरे, महेश नाईक, विजय गावडे, राधाकिसन रौंधळे, बाळासाहेब कोळेकर, संगिता डोके, पांडुरंग रूपनवर, बाळासाहेब तोंडेपाटील, विठ्ठल कोकरे, तुकाराम साठे, पोपट मेरगळ, ललित बंडगर, बाळासाहेब गरदरे, डॅा. प्रशांत शेंडगे, डॅा.अभिमन्यू टकले, रमेश वाघे उपस्थित होते.  

Friday, October 5, 2018

दौंड | पारगाव | जिलेटीनच्या साहय्याने पारगावातील अवैध वाळू उपसा करणरे तर...

जिलेटीनच्या साह्यय्याने पारगाव मधील अवैध वाळू उपसा करणारे तराफे उद्धवस्त !


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: ता.०५/१०/२०१८
दौंड तालुक्यातील पारगाव येथे अनेक दिवसापासून भीमा नदी पात्रात तराफ्याच्या साह्याने वाळु उपशा होत असल्या बाबतची तक्रार महसुल विभागाला मिळाली होती, त्यानंतर दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी  यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तराफे उध्वस्त करण्यात आले , यावळी निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे , मंडल अधिकारी विजय खारतोडे,प्रकाश भोंडवे.  तलाठी उध्दव गोसावी. सचिन जगताप. दिपक पांढरपट्टे. रवि फणसे यांनी हि  कारवाई केली,  या कारवाई मुळे वाळु उपशा करणा-यांचे धाबे दणाणले आहे,

Wednesday, October 3, 2018

पारगावात तरुण एकत्र येऊन करत आहे अवैध वाळू उपसा !


पारगावात तरुण एकत्र येऊन करत आहे अवैध वाळू उपसा !
कमी श्रमात खूप सारा पैसा,त्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन व गावात दहशतीचे वातावरण

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.०३/१०/२०१८
दौंड तालुक्यातील पारगाव(सा.मा) येथे वाळू उपसा जोरात चालू आहे.यामध्ये गावातील तरुण एकत्र येऊन तीन ते चार तराफे वाळू उपस्यासाठी चालवतात.भीमा नदीच्या पात्रातून हा वाळू उपसा करून शेजारील शेतकऱ्यांच्या शेतामधून पिकाची नासधूस करून दमदाटीच्या जोरावर सर्रास पणे चालू आहे.
कमी श्रमात हा वाळूचा पैसा आल्याने हे तरुण दारूच्या व्यसनाधीन बनले आहेत.गावात त्यांनी एकप्रकारे दहशत निर्माण केली आहे.त्यामुळे गावातील नागरिक व महिला असुरक्षित आहेत असे गावातील लोक बोलताना पहावयास मिळत आहेत.
आम्ही कुणालाच घाबरत नाही,कोतवाला पासून ,गावकामगार  तलाठी,मंडल अधिकारी तसेच तहसीलदार यांना वेळेवर हफ्ता पोहचवला जातो त्यामुळे बिनधास्त पणे जोमाने वाळू उपसा करावयाचा असे ब्रीदच या वाळू बहादरांनी मनाशी बांधले आहे.
काही दिवासापुर्वीच पारगावच्या शेजारी असणाऱ्या देलवडी येथे वाळूच्या वादातून तरुणाची आत्महत्या झाली आहे.असे अनेक प्रकार हे वाळूच्या वादातून दौंड तालुक्यात राजरोसपणे चालू आहेत.
आता महसूल विभाग या वाळू चोरावरती कारवाई करणार का? आपला मलिदा चालूच ठेऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान करणार हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.

Thursday, August 23, 2018

दौंड | पारगाव येथील वन विभागातील अतिक्रमणे हटवली;मजूरांचा संसार उघड्यावर !

नानगावच्या उपसरपंच पदी शारदा खळदकर !

           नानगावच्या उपसरपंच पदी शारदा खळदकर !

नानगावच्या उपसरपंच पदी शारदा खळदकर !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:ता.२३ऑगस्ट २०१८
दौंड तालुक्यातील नानगाव ग्रामपंचायत येथे आज (ता.२३ऑग) रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती.यादरम्यान नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे,छाननी, माघार घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण केली असता यामध्ये फक्त एकच अर्ज आला होता.शारदा दादासो खळदकर यांची सर्वानुमते बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पोपट शेलार ग्रामविकास अधिकारी यांनी काम पाहिले.

माजी पंतप्रधान कै.अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्या कारणाने मिरवणूक ,गुलालाची उधळण हे टाळून फक्त एक नारळ देऊन नवनियुक्त उपसरपंच यांचे अभिनंदन करण्यात आले.

Monday, August 20, 2018

नानगावच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा !



नानगावच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा !

डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधी:ता.२१ ऑगस्ट २०१८
नानगाव ता.दौंड येथे सोमवार(ता.२० ऑग) रोजी भैरवनाथ मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नानगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
भारत देशाचे माजी पंतप्रधान कै.अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून ग्रामसभेस सुरुवात करण्यात आली.
नानगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पोपट शेलार यांनी मागील ग्रामसभेचे प्रोसेडिंग वाचून १ ते ७ विषयी अजेंठा वरील विषय मार्गी लावले.गावातील सामाजिक कार्यकर्ते विष्णू खराडे यांनी १४ व्या वित्त आयोगातील विकास आराखड्याची मागणी केली.त्या दरम्यान ग्रामविकास अधिकारी यांनी सन २०१६-२०१७ मधील एकूण २५ लाख रुपयांची व २०१७-२०१८ मधील २९ लाख ७५ हजार १९१ रुपयांची विकास आराखड्याचे इतिवृत्त सादर केले.आरोग्य विभाग,आरो प्लांट,अंगणवाडी दुरुस्ती,समाज मंदिर,व्यवसायिक प्रशिक्षण,महिला बालकल्याण विभाग,सोलर स्ट्रीट लाईट,व्यायाम शाळा,मशीद अशा ई विकास कामासंदर्भात १४व्या वित्त आयोगातून मंजुरी मिळाली आहे व नियोजित कामास सुरुवात करण्यात आली आहे असे इतिवृत्त वाचून सर्वांसमोर सादर केले.
ऐनवेळीच्या विषयात संजय शेलार यांनी सांगितले की,नानगाव हे ५००० हजार लोकसंख्येचे वरती असून,ग्रामविकास अधिकारी व गावकामगर तलाठी हे स्वतंत्र असावे.सद्य परिस्थिती दोन्हीही अधिकारी अतिरिक्त गावांचा पदभार सांभाळत आहे.त्यामुळे नानगाव मधील नागरिकांना दाखले व इतर कामासाठी ताटकळत बसावे लागत आहे.अन्यथा आम्हाला हे अधिकारीच नकोत दुसरे स्वतंत्र अधिकारी मिळावेत अशा प्रकारचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.माजी दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विशाल शेलार यांनी ग्रामस्थांना विनवणी केली की,दर शनिवारी नव्याने सुरू झालेला आठवडे बाजाराला सर्वांनी सहकार्य करावे .त्यामुळेच आपल्याला ग्रामदैवत असलेल्या रासाई देवीसाठी तीर्थस्थान म्हणून 'क' दर्जाचे स्थान मिळण्यासाठी मदत मिळेल.
पूर्वीचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला असून,सर्वानुमते नवनियुक्त 

संजय गोविंद रासकर 
यांची एक वर्षासाठी 
तंटामुक्ती अध्यक्ष 
म्हणून निवड 
करण्यात आली.

प्राथमिक केंद्रातील 
वैद्यकीय अधिकारी 
टी. आर.बनसोडे 
यांनी १० वर्ष अविरतपणे
 सेवा दिली त्याबद्दल त्यांचे 
सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले.

Thursday, July 19, 2018

दौंड | ३५ लाखाचे काम ३० लाखात करून ५ लाख कसे मिळवायचे? रमेश थोरात

दौंड | पारगाव मध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिष...

नानगाव येथे आण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी


नानगाव येथे आण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी :ता.१८ जुलै २०१८
नानगाव ता.दौंड ग्रामपंचायत येथे आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पंचायत समिती दौंड सदस्य सयाजी ताकवणे यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पहार घालण्यात आला.पुण्यतिथी निमित्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी सयाजी ताकवणे,सी. बी. खळदकर,विकास खळदकर,माणिक आढागळे व विष्णू खराडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

Sunday, July 15, 2018

वारी विशेष २०१८ | राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून "पथनाट्यातून समाज ...

नानगाव मधील ४ शेतीपंप गेले चोरीला !

















नानगाव मधील ४ शेतीपंपातील तांब्याच्या तारा चोरांनी केल्या गायब !

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:भीमा नदीच्या तीरावरील असणार्या शेतकऱ्यांच्या ४ शेती पंप मोटारीतील अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या तारा चोरी केल्या आहेत.शेतीपंपात असणारी तांब्याची तार,विद्युत साहित्य,चुंबकीय आवरण ई किमतीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.दि.१४ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या चोरट्यांनी शेजारील उसाच्या शेतात मोटारीतील साहित्य खोलून व्यवस्थित पणे विल्हेवाट लावलेली दिसून आली आहे.शेतकरी बापू शंकर गुंड हे सकाळी दि.१५ जुलै रोजी शेतात फेरफटका मारण्यास गेले असल्यास त्यांना हि सर्व बाब निदर्शनास आली.त्यावेळी त्यांनी शेजारील शंकर नारयण गुंड व इतर दोन शेतकऱ्यांस संपर्क करून हि माहिती दिली.
या पूर्वीही अश्याच प्रकारे इतर शेतकर्यांचे शेती पंप चोरीला गेले आहेत.सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून,आधीच शेती मालाला भाव नसून शेतकरी अडचणीत आहे.त्यात या शेती पंपाच्या चोरी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेतकरी राजा अडचणीत येत आहे.यावर पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालून या चोऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तर शेतकरी राजाचे भले होईल असे यावेळी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

Tuesday, July 10, 2018

वारी विशेष || डी न्यूज लाईव्ह प्रस्तुत "वारी पंढरीची" !!!

पालखी सोहळा २०१८ | सोहेल खान यांनी संत तुकाराम महाराज पालखीचे केले स्वागत !

पालखी सोहळा २०१८| आप्पासाहेब पवार यांनी संत तुकाराम महाराज पालखीचे केले ...

पालखी सोहळा २०१८ | रमेश थोरात यांनी संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत के...

पालखी सोहळा २०१८ | रमेश थोरात यांनी संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत के...

पालखी सोहळा २०१८ | दौंड तालुक्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख...

Sunday, July 8, 2018

दौंड | कुरकुंभ येथे हार्मोनिया ऑर्गनाईज कंपनीमध्ये कॉलमची गॅस किट फुटून ...

कुरकुंभ येथे हार्मोनिया ऑर्गनाईज कंपनीमध्ये कॉलमची गॅस किट फुटून अपघात



 कुरकुंभ येथे हार्मोनिया ऑर्गनाईज कंपनीमध्ये कॉलमची गॅस किट फुटून अपघात
 स्टायरिंग ऑक्सईडचे दूरच्या दूर लोट;लोकांमध्ये भीतीचे वातावरण !

कुरकुंभ प्रतिनिधी:(अलीम सय्यद) कुरकुंभ(ता.दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील हार्मोनिया ऑर्गनाईज लि. या कंपनीत स्टायरिंग ऑक्साईड  या केमिकलचे प्रोडक्शन काढत असताना या केमिकलची वाफ जाण्यासाठी कॉलम (पाईप) चा वापर करतात या कॉलमची गॅस किट फुटून लिकीज झाल्याने पूर्ण परिसरात स्टायरिंग ऑक्साईड च्या गॅसचे लोट दिसत होते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीची उभारणी १९८९ मध्ये झाली असून,कंपन्या आल्या की येथे उद्योग धंदे सुरू होऊन रोजगार उपलब्ध होतील बेरोजगार युवकांना कंपनीत कायम स्वरूपी नोकऱ्या मिळतील अशी शेतकऱ्यांची आशा होती.मात्र औद्योगिक वसाहततील जलवायू ध्वनी प्रदूषणाने परिसरातील १० किलोमीटर  पर्यंतच्या नागरी वस्त्या बाधीत झाल्या आहेत.औद्योगिक वाहतीतील कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही निकष पाळत नाहीत.अशातच अशा दुर्घटना होत असल्याने याकडे वेळीच संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
कुरकुंभ औद्योगित वसाहतीत नव्वद टक्के कंपन्या विविध प्रकारचे केमिकल वर प्रक्रिया आणि उत्पादन केले जाते यामुळे कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही केमिकल झोन म्हणून ओळखले जाते.दरम्यान  रविवार (दि ०८ ) रोजी  हा अपघात दुपारी  अडीच च्या सुमारास झाला आहे.तसेच संबंधित कंपनी शेजारी अल्काईल अमाईन्स ही मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने वेळीच स्टायरिंग ऑक्साईडच्या गॅसचे लोट अग्निशमनच्या तीन बंबाने वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला संबंधित कंपनी ही पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यालगत असल्याने कुरकुंभ तसेच  मुकादमवाडी येथील नागरिकांनी स्टायरिंग  ऑक्साईड चे लोट पाहण्यास कंपनीच्या गेट वर गर्दी केली होती.याचे लोट इतके भयंकर होते की सात की.मी वर मळदगावा पर्यंत याचे लोट दिसत होते.त्यामुळे काही काळ नागरिकांना मध्ये भितीचे वातावरण होते.नेमका हा प्रकार कशामुळे झाला याबद्दल कंपनी प्रशासन काहीच बोलायला तयार नव्हते.याचे लोट १ तासापर्यंत निघत असल्याने लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते.दरम्यान कुरकुंभ पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी  घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करून या अपघातात कसलीही जीवित हानी झाली नसल्याचे यावेळी सांगितले.

पालखी सोहळा २०१८ |संत तुकाराम महाराज | अंकुश गवळी(सामाजिक कार्यकर्ते) वा...

पालखी सोहळा २०१८ | जगद्गुरू संत तुकाराम महाराज | यंदा निर्मल वारीचे चौथे...

पालखी सोहळा २०१८ | संत तुकाराम महाराज | अंकुश गवळी(माजी सरपंच,कानगाव) वा...

पालखी सोहळा २०१८ | संत तुकाराम महाराज | गणेश आखाडे(अध्यक्ष,भाजपा,दौंड) व...

Saturday, July 7, 2018

दौंड | चौफुला | न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव यांना अमेरिके...

दौंड | पाटसला नाथपंथी गोसावी समाजाकडून राईनपाडा घटनेचा निषेध

कुरकुंभ येथील हॉटेल आंनद गार्डन मध्ये चोरी ! अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल


कुरकुंभ येथील हॉटेल आंनद गार्डन मध्ये चोरी !
अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल

कुरकुंभ प्रतिनिधी : (अलीम सय्यद) कुरकुंभ ( ता.दौंड ) येथील कुरकुंभ  पांढरेवाडी रस्त्यालगत भोंगळेवस्ती जवळ असलेल्या  हॉटेल आंनद गार्डन मधुन पंधरा हजार तीनशे अकरा रुपयांचा मुद्देमाल  चोरी करून  हॉटेल मधील तीन वेटर कामगारांना   अज्ञात चार चोरट्यांनी  मारहाण करून चोरी केल्याची घटना ( दि. ७ जुलै ) रोजी पहाटे २:४५ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गोपी चंद्रसिंह रावत वय ३२ सध्या रा. हाॅटेल आनंदगार्डन कुरकुंभ, मूळ रा. तुना, पो. सुमेपूर ता. जि. रुद्रप्रयाग, राज्य उत्तराखंड, यांनी अज्ञात चोरट्यां विरोधात कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात फिर्याद दिली याबाबत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  दि ६ जुलै रोजी रात्री ११ वा चे सुमारास हॉटेल मॅनेजर अभिजित लाला भंडलकर (रा. कुरकुंभ ) यांनी हाॅटेल बंद केले होते. त्यानंतर जेवण करून फिर्यादी गोपी रावत व प्रमोदकुमार योगेंद्र मुखीया, विमलकुमार योगेंद्र मुखीया असे तिघे कामगार हाॅटेलमध्ये काउंटर जवळ झोपले होते. शनिवार (दि.७) रोजी पावणेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी  हाॅटेलच्या माघील असलेल्या खोलीचा पत्रा उचकटून खोलीचा लोखंडी दरवाज्याला आतून लावलेली कुलपाची कडी कटरने तोडून हाॅटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी खडबड आवाज आल्याने फिर्यादी जागे झाले व इतर दोघांना झोपेतून उठवले असता समोर चार चोरटे उभे होते. अज्ञात चोरट्यांनी  विमलकुमार मुखीया यास तोंडावर डाव्या डोळ्यांवर पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. पैसा किधर रखा है, असे म्हणत चोरट्यांनी तिघांना लोखंडी वरगाळे, पाईपने, पाठीत व इतर ठिकाणी मारहाण केली. यानंतर काउंटरच्या ड्रावरमधील रोख रक्कम,  पैशाचे पाकिट, दारूच्या बाटल्या , मोबाईल फोन, सॅक बॅग, असे मिळून एकूण १५ हजार ३११ रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादीत म्हंटले आहे.  याप्रकरणी पुढील तपास कुरकुंभ पोलिस करीत आहे.

Saturday, June 23, 2018

आनंद भोसले या शिक्षकाचे नानगाव येथील जि.प.प्रा.शाळेत कौतकास्पद कार्य !



पी.बी.गांधले(मुख्याध्यापक) व ए.एच.भोसले(उपशिक्षक) यांचा निरोप समारंभ
आनंद भोसले या शिक्षकाचे नानगाव येथील जि.प.प्रा.शाळेत कौतकास्पद कार्य !
पाटेठाण येथील शाळेत बदली; भोसले शिक्षक मुलांच्या व पालकांच्या कायम मनात राहतील

दौंड प्रतिनिधी:जि.प.प्रा.शाळा नानगाव येथील पी.बी.गांधले(मुख्याध्यापक) व ए.एच.भोसले(उपशिक्षक) यांची २७/०२ च्या जीआर नुसार बदली झाली असून,या दोन्हीही शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन (२३जून) रोजी ग्रामस्थांनी व पालकांनी केले होते.यावेळी पालकांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी आपल्या मुलांना लावलेल्या शिस्तीविषयी व गुणवत्ता वाढीसाठी केले प्रयत्न हे खर्च खूप कौतुकासप्द असल्याचे सांगण्यात आले.या वर्षीपासून शाळेच्या नूतन इमारतीमध्ये मुलांचा प्रवेश झाला आहे.या नूतन इमारतीसाठी आनंद भोसले व गावकर्यांनी केले प्रयत्न अखेर यशाला आले आहे.सुट्टीच्या काळात सुद्धा शिक्षक आनंद भोसले यांनी स्वतः हजेरी लाऊन शाळेला रंगरोटी व इतर काम काम करून घेण्यास मोठा मोलाचा हातभार लावला आहे.सांस्कृतिक,कला,क्रीडा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास कायम तत्पर असलेले भोसले शिक्षक मुलांच्या व पालकांच्या कायम मनात राहतील.दौंड तालुक्यातील पाटेठाण या शाळेत यांची बदली झाली असून ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यास यावेळी भरभरून शुभेच्छा दिल्या.

दौंड | पाटस | अहिल्यादेवी होळकर यांच्या शिल्पसृष्टीची तोडफोड निषेधार्त प...

Saturday, June 16, 2018

Friday, June 15, 2018

दौंड|आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळं आणि बि...



शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात शिवसेनेच्या वतीने फळं आणि बिस्किटांचं वाटप 

Thursday, June 14, 2018

छत्रपति फिल्मस् सागर शेलार प्रस्तुत हत्याकांड चा ट्रेलर सध्या बहुचर्चित ठरतोय !!!



छत्रपति फिल्मस् सागर शेलार प्रस्तुत हत्याकांड चा ट्रेलर सध्या बहुचर्चित ठरतोय !!!

Wednesday, June 13, 2018

मजुरांच्या मुलांची यशाला गवसणी ; दहावीत यश गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत महाराष्ट्र राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक




"मजुरांच्या मुलांची यशाला गवसणी ; दहावीत यश गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत महाराष्ट्र राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक"

डी न्यूज लाईव्ह कुरकुंभ प्रतिनिधी(अलीम सय्यद) : श्री फिरंगाईमाता विद्यालयातील अतिशय गरीब कुटुंबातील व घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या कु.गौरी सदाशिव जाधव व अंकित नारायण कांबळे या दोन विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत महाराष्ट्र राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळवीत विद्यालयाचे नावलौकिक केले आहे.यश मिळविण्यासाठी कौटुंबिक परिस्थितीची गरज नाही तर जिद्द चिकाटी आत्मविश्वासाची गरज आहे. हे या दोन विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. अंकित कांबळे याची घरची परिस्थिती बेताची असल्याने तो शाळेतून घरी गेल्यावर रात्री वडिलांच्या मदतीसाठी पावभाजी ची गाडी चालवीत असे अशा हलाखीच्या परिस्थिती मध्ये दहावीत ८६.८० टक्के मिळवीत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवीत राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळविला.तर कु. गौरी सदाशिव जाधव हिने ९०.६० टक्के मिळवीत गणित विषयात१०० पैकी १०० गुण मिळवीत राज्यात गणित विषयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.या दोन विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.कोणतीच खासगी शिकवणी नसताना ना कोणतीच सुविधा नसताना देखील प्रतिकूल परिस्थिती वर मात करत यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. एकिकडे सर्व सोयी सुविधा घेऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या पालकांनी याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे.  परिस्थितीशी सामना करीत उत्तम गुणवत्ता समाजापुढे ठेवणाऱ्या या दोन विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून ही कौतुक होत आहे.

या दोघांना विद्यालयातील गणित विषय शिक्षक  बाबासो सांगळे  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गणित विषयाबद्दल असणारी आवड,सराव तसेच गणित शिक्षक सांगळे  यांचे लाभलेले मोलाचे मार्गदर्शन हेच आमच्या यशाचे रहस्य आहे असे या दोन विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.

"यशाकरिता कुठल्याही सोयी सुविधांची गरज नसते फक्त आवड व काहीतरी करून दाखविण्याची जिद्द लागते."
                             .........प्राचार्य,नानासाहेब भापकर  (श्री फिरंगाईमाता विद्यालय कुरकुंभ )

दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुण कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या रोजगारापासून वंचित !



"दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुण कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या रोजगारापासून वंचित !"



डी न्यूज लाईव्ह कुरकुंभ प्रतिनिधी (अलीम सय्यद): दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या करिता येथील स्वतः पुढाकार घेऊन स्थानिक रोजगार उपलब्ध देण्याकरिता येथील तरुणांनी पुढाकार घेतला आहे.शासनाच्या नियमानुसार कंपनीच्या आस्थापनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारावर प्रथम प्राधान्य हा स्थानिक बेरोजगारांना मिळणे आवश्यक आहे पण कुरकुंभ एम आय डीसी येथील परप्रांतीयांना पहिले प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जाते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही प्रदुषणासाठी बहुवार्चित   आहे ,  गेली तीस वर्षांपासून औद्योगिक वसाहतिचे प्रदुषण ग्रामस्थ सहन करीत आहेत ,अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला प्रदूषण जास्त असताना ही पर्यायी व्यवस्था नसल्याने बहुतांश स्थानिक शेतकरी त्रास सहन करीत याच ठिकाणी राहत आहेत. कित्येकांची जमीन वसाहतितील कंपन्यांना गेल्या आहे अशा स्थितितही स्थानिकाना  प्राधान्य दिले जात नसल्याने वसाहतविषयी उच्चशिक्षित तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.  असताना देखील येथील स्थानिक तरुणांना नोकरीचा  खालचा दर्जाची वागणूक येथिल कंपन्यांकडून दिली जात असल्याचा दावा येथील बेरोजगार करीत आहे  कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्या स्थानिक तरुणांना रोजगारीकरिता प्राधान्य देत नसल्याने परिसरात बेरोजगार तरुनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न गंभीर बनत चालला आहे  कुरकुंभ आणि पांढरेवाडी , परिसरातील युवक सुशिक्षित आणि उच्चशिक्षित आहेंत आशावेळी पात्रता असूनही नोकरीसाठी केलेला अर्जाची साधी दखलही कंपन्यांकडून घेतली जात नाही.संबधित युवक कंपनीच्या गेटवर विचारना करण्यासाठी गेल्यास किंवा संबंधित अधिकार्यांना भेटल्यावर त्यांनी हिन् दर्जाचा वागणूक देत उडवाउडवीची उत्तरे देउन परत पाठवून दिले जाते. गावामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे शिक्षण घेउन देखिल रोजगार मिळत नसल्याने तरुण वाममार्गाचा अवलंब करीत आहेत, याच प्रश्नावर विचार करून येथील स्थानिक तरुण  युवक स्वतः सहभाग घेत एम आय डी सी मधील प्रत्येक कंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्होवा या करिता प्रत्येक कंपनीत जाऊन स्थानिकांना रोजगार मिळवा असा पत्र , अर्ज, प्रत्येक कंपनी ला देण्यात आला आहे.  सर्व तरुण एकत्र येऊन या लढ्याला यश मिळेल अशी अपेक्षा येथील तरुण करीत आहे.

"गेली तीस वर्षांपासून आम्हाला या कंपन्यांनी हीन दरजेची वागणूक दिली पण आता आम्हाला न्याय हवा यामुळे आम्ही सर्व तरुण या प्रत्येक कंपनीना अर्ज देत आहोत."
                                                                      ................ बेरोजगार तरुण 

"पुढील काळाचा विचार करून स्थानिक तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार काम व अन्य व्यवसाय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. "
                         ........... छाया नानासो झगडे (सरपंच(नवनिर्वाचित),ग्रा.पं.पांढरेवाडी)  
                         ...........रशीद मुलाणी (सरपंच(प्रभारी),ग्रा.पं.कुरकुंभ)
                         ...........राहुल भोसले (सरपंच(नवनिर्वाचित),कुरकुंभ)

मा.शरदचंद्रजी सूर्यवंशी नेते,शिवसेना,दौंड यांच्या कडून डी न्यूज लाईव्ह च...



मा.शरदचंद्रजी सूर्यवंशी नेते,शिवसेना,दौंड यांच्या कडून डी न्यूज लाईव्ह चॅॅनेल ला हार्दिक शुभेच्छा

Monday, June 11, 2018

"एक मित्र एक वृक्ष' ग्रुप ने जागतिक नेत्रदानानिमित्त नेत्रदान जागृती अभियान,वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन


"एक मित्र एक वृक्ष' ग्रुप ने जागतिक नेत्रदानानिमित्त नेत्रदान जागृती अभियान,वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन

यावेळी विठ्ठलवाडीतील ९७ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला.तसेच मृत्यूनंतर नेत्रदान केलेल्या नेत्रदात्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला.एक मित्र एक वृक्ष या ग्रुपचे अध्यक्ष  प्रशांत मुथा यांनी गेली ३ वर्षे केलेल्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. श्रीवल्लभ अवचट यांनी आयुर्वेदिक व देशी वृक्षांचे महत्व सांगितले.मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलवाडी शाळेत अडूळसा, पारिजातक, सिसम, वड, पिंपळ, कडूलिंब, बहावा, बकूळ, ताम्हण, उंबर, पांगारा, पळस, आपटा अशा विविध दुर्मिळ व देशी वृक्षांचे रोपन करण्यात आले. "झाडे लावू-झाडे जगवू" हा संदेश देण्यात आला.यावेळी सुभाष फासगे यांनी नेत्रदान जागृतीवर रांगोळी रेखाटली होती.तसेच दौंडचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रेमकुमार भट्टड यांनी नेत्रदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
दौंड तालुक्यात १२ वीच्या विज्ञात शाखेत प्रथम आलेली निकिता जालिंदर कांबळे व १० वीमधून प्रथम आलेली नेहा जालिंदर कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर देऊळगावगाडा माध्यमिक विद्यालयामध्ये १० वीमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेले प्रतिक्षा दादा बारवकर, पवन पोपट बारवकर,प्रतीक नानासो बारवकर,किरणकुमार होले,ॠषिकेश बारवकर या गुणवंत विद्यार्थ्यांचेही वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.

Friday, June 8, 2018

आदित्य ने मांडवगण फराटा गावाचे नाव देश पातळीवर झळकावले




मांडवगण फराटा,शिरूर
मांडवगण फराटा येथील लहाणग्या आदित्य जगताप ने सात मिनींटात सोडविली 150 गणिते!
आदित्य ने मांडवगण फराटा गावाचे नाव देश पातळीवर झळकावले.
आदित्य याच वय अवघे 9 वर्षे आहे.
कोणत्याही प्रकारच गणित विचारा आदित्य क्षणात उत्तर देणार.
आदित्यने त्याच्या बुद्धी कौशल्याने आत्तापर्यंत देश आणि राज्यपातळीवर बुद्धिबळ स्पर्धेत 3 ट्रॉफी, आणि 2 मेडल मिळवलेले आहे.
अब्याकस मध्ये मुंबई येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 5 मिनिटात 100 गणिते सोडवून भारत देशात दुसरा येण्याचा मान मिळवला.
महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळवला आणी देश पातळीवर आदित्यची निवड झाली.
गावचे पोलिस पाटील गंगाधर भाउसाहेब फराटे, हे आदित्यचे आजोबा आहेत.