डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी: ता.०५/१०/२०१८
दौंड तालुक्यातील पारगाव येथे अनेक दिवसापासून भीमा नदी पात्रात तराफ्याच्या साह्याने वाळु उपशा होत असल्या बाबतची तक्रार महसुल विभागाला मिळाली होती, त्यानंतर दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तराफे उध्वस्त करण्यात आले , यावळी निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे , मंडल अधिकारी विजय खारतोडे,प्रकाश भोंडवे. तलाठी उध्दव गोसावी. सचिन जगताप. दिपक पांढरपट्टे. रवि फणसे यांनी हि कारवाई केली, या कारवाई मुळे वाळु उपशा करणा-यांचे धाबे दणाणले आहे,