केडगाव प्रतिनिधी : ता.२२ फेबु २०२०
महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती (तारखेनुसार) संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने ठीकठिकाणी मिरवणुका,बाईक रॅली व अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नानगाव ता.दौंड येथील अण्णा भाऊ साठे सभागृह गणेशरोड येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन कसे करायाचे जे कळाले होते ते आता कुणालाच कळत नाही हे खूप मोठे दुर्दाव्य आहे.आता तरी सर्वाना घेऊन पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी अशी खंत यावेळी भाजपा अनु.जमा.मोर्चा दौंड तालुका अध्यक्ष माणिक आढागळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
तरुण वर्गाला यावेळी विष्णू खराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते व त्यांचे कोणते गुण अंगिकारले पाहिजे या विषयी सविस्तर असे आपल्या व्याखानातून मार्गदर्शन केले.
यावेळी विठ्ठ्ल खराडे,सचिन शिंदे,राजकुमार मोटे,विष्णू खराडे,शंकर देवकर अनिल गुंड,संजय रासकर, संभाजी खळदकर,श्रीकांत ससाणे व हनुमान तरुण मंडळचे सर्व सदस्य व आदि उपस्थित होते.