भाग -१
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी :ता.०३ ऑगस्ट २०१९
महावितरण कंपनीने बाह्यस्त्रोत कामगारांना पूर्वी कोणतीही शैक्षणिक
अहर्ता नसल्या कारणाने शिकाऊ म्हणून कामावर रुजू केले होते.
परंतु आता शासनाच्या आदेशानुसार दहावी पास व आयटीआय इलेक्ट्रिशियन
कोर्स असणे आवश्यक आहे.पूर्वी शिकाऊ कामगार मोठ्या प्रमाणात होते.त्यांच्याकडे कोणतीच
शैक्षणिक अहर्ता नसयाची व जोखमीचे काम अशा कामगारांना कडून करून घेतले जात असे.
बर्याच वेळा याबाबत दुर्घटना घडल्या आहेत.अशा कामगारांना अपंगत्व आले
आहे.जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
परंतु कोणतीच भरपाई मिळत नसयाची.कारण कि,या कामगारांचे अपुरे
कागदपत्रे व शैक्षणिक अहर्ता पूर्ण नसल्याने या लोकांना व त्याच्या परिवाराला
आर्थिक सहाय्य मिळत नसायचे.
एका व्यक्तीची कागदपत्रे व दुसरा व्यक्ती त्याच्या जागेवर काम करत आहे
असे प्रकार सर्यास महावितरनाच्या प्रत्येक डिव्हिजन ला चालू आहे.अशी माहिती नाव न सांगण्याच्या
अटीवर प्रसार माध्यमाना देण्यात आली आहे.असे होत असताना कोणतेच कागदपत्र महावितरण
कडे नसल्याने काम करताना कोणती दुर्घटना झाली तर,महावितरण हातवर करत असे.
कारण कि,हा आमचा कर्मचारी नाही असे महावितरण कडून सांगितले जात असे.व
त्या कामगारांना कोणताच मोबदला मिळत नसायचा.
आता देखील या आदेशामुळे इलेक्ट्रिशयन व्यक्ती किंवा त्या शैक्षणिक
अहर्ता पूर्ण असणारा उमेदवार पात्र होऊ शकतो.आता हे पाहणे गरजेचे आहे कि,आयटीआय
वायरमन ची भरती केली कि,पूर्वीचे शिकाऊ जैसे थे,असेच ठेवले आहेत का? ज्या
कामगारांकडे शैक्षणिक अहर्ता पूर्ण नसेल व तो कामगार कामावर आहे तर तो कोणाच्या
आशीर्वादाने कामावर आहे असा सवाल सध्या उपस्थित आहे.
“शिरूर तालुक्यातील
मांडवगण फराटा येथील सब डिव्हिजन मध्ये असे प्रकार चालू असल्याचे आढळून येत आहेत.याबाबत
कनिष्ट अभियंता एम मुलांनी यांनी सांगितले कि,ज्यांची शैक्षणिक अहर्ता पूर्ण आहे
अशाच कामगारांना आम्ही रुजू करून घेत आहोत.कामगार नेमण्यासाठी खाजगी कंपनीकडे सर्व
जबाबदारी सोपवली आहे.ज्यांची शैक्षणिक अहर्ता पूर्ण नाही त्या कामगारांना
मिळालेल्या परिपत्रकानुसार कामावरून कमी केले जाणार आहे.”
-एम.ए.मुलांणी (कनिष्ठ अभियंता,मांडवगण फराटा)
“शैक्षणिक अहर्ता
पूर्ण असलेल्या उमेदवारांनी संबधित कंपनीकडे संपर्क साधण्याचे आव्हान यावेळी कार्यकारी
अभियंता आर.एस.येडके यांनी केले आहे.”
-आर.एस.येडके
(कार्यकारी अभियंता)